spot_img

सावंगी रुग्णालयातील शिशुतज्ज्ञांचे योगदान, बाळाला लाभले जीवनदान  पंचवीस दिवसांनंतर बाळाने घेतला नैसर्गिक श्वास

वर्धा – अवघ्या एक दिवसाच्या बाळाला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर घेतले जाते आणि पुढे तब्बल २५ दिवस त्याला कृत्रिमरित्या प्राणवायू पुरवठा केला जातो. चार आठवड्यानंतर या दिव्यातून बाळ सुखरूप बाहेर पडते आणि बाळासोबतच आई, वडील, नातलग व डॉक्टरही मोकळा श्वास घेतात. सावंगी मेघे रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागातील डॉक्टरांच्या या योगदानामुळे सर्वांच्या ओठावर फुलून आलेले हसू अनमोल ठरते.
सविस्तर वृत्त असे की, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील युगंधरा आशिष भट ही प्रसूतीकरिता माहेरी वर्ध्यातील एका खाजगी रुग्णालयात भरती झाली. तिचे बाळंतपण सुखरूप होऊन तिने एका गोंडस व सुदृढ बाळाला जन्म दिला. मात्र बाळंतपणाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे अचानक बाळाला धाप लागून त्याचे संपूर्ण शरीर निळे पडू लागले. एक दिवसाच्या बाळाचे माहेरच्या आणि सासरच्या लोकांकडून कोडकौतुक होत असताना अचानक झालेल्या या बदलामुळे सर्व घाबरून गेले. प्रसूतीगृहातील डॉक्टरांनी तपासणी करून त्वरित सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लगेच सावंगी मेघे रुग्णालयात बाळाला नेण्यात आले. नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अर्जुन जयस्वाल यांनी बाळाची तपासणी करून त्याला नवजात शिशु अतिदक्षता विभागात भरती केले. बाळाला श्वास घेताना प्रचंड त्रास होत असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. त्यासोबतच अन्य तपासण्याही सुरू करण्यात आल्या. तपासणीअंती बाळाच्या संपूर्ण शरीरात, विशेषतः फुफ्फुसात जंतुसंसर्ग पसरल्याचे निदान झाले. 
नवजात बाळाच्या प्रकृतीची नातेवाईकांना कल्पना देत डॉ. अर्जुन जयस्वाल व डॉ. सागर कारोटकार यांनी बालरुग्णांची

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या